ष षडयंत्र , फजिती , हक्क  आणि  माफिया     कोरेगाव - भीमा  येथील  प्रकरणात  नक्षलवादी  समर्थकांचा  हात  आहे , असा  आपल्या  सुरक्षा  यंत्रणांना  संशय  असताना  पाकिस्तानच्या  सिनेटचा  गेल्या  वर्षीचा  अहवाल  हा  संशय  बळकट  करणारा  ठरतो . हा  अहवाल  नुकताच  प्रकाशात  आला . भारत - पाकिस्तान  संबंधांवर  धोरण  निश्चित  करण्यासाठी  या  अहवालात  २२  मुद्द्यांवर  भर  देण्यात  आला  आहे . त्याचा  गोषवारा  असा : भारतातील  दलित , मुस्लिम , शीख  आणि  ख्रिश्चन  यांच्यात  अलगत्वाची  भावना  निर्माण  झाली  पाहिजे . माओवाद्यांच्या  हालचालींकडे  लक्ष  द्यायला  हवे . भारताशी  संबंधांबाबत  कार्य  करणाऱ्या  दोन  संस्था , इस्लामाबाद  पॉलिसी  रिसर्च  इन्स्टिट्यूट  आणि  इन्स्टिट्यूट  ऑफ  रिजनल  स्टडीज , यांची  जबाबदारी  अधिक  आहे . राष्ट्रीय  स्वयंसेवक  संघ  आणि  मोदी  यांचे  हिंदुत्व  हे  त्यांचे  ' लक्ष्य ' असायला  हवे . मोदींच्या  पाकिस्तान  विरोधी  धोरणाला  विरोध  करणारे  राजकीय  पक्ष , पत्रकार , सामाजिक  संघटना  आणि  मानवाधिकार  कार्यकर्ते  यांच्याशी  संपर्क  साधायला  हवा .   काश्मीर  विषयावर  आं...
 तापलेल्या राजकीय वातावरणाला दहशतवादाची फोडणी      सार्वत्रिक निवडणुकांना अद्याप चार महिन्यांचा कालावधी असला, तरी पाकिस्तानातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्यात दंग झालेले तीन प्रमुख पक्ष - पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ), पाकिस्तानी पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ - तसेच दहशतवादी संघटनांना पाकिस्तानात मिळणारा आश्रय यांवरून विचारवंतांनी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे, असे चित्र आज दिसत आहे. "मुलाकडून पगार घेतला नाही, हाच काय तो माझा दोष?" अशी आर्त हाक देत पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सभांचा धडाका लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पद सोडावे लागले, याची सल त्यांच्या मनात कायम आहे. त्यामुळेच "माझे तुमच्यावर मनापासून प्रेम आहे. कोट्यवधी लोकांनी मला पंतप्रधान म्हणून निवडून दिले. मग मला बडतर्फ करणारे ते पाच जण (सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती) कोण?" असा सवाल करीत शरीफ आपल्याला बळीचा बकरा बनविण्यात आले, अशी हाकाटी पिटत फिरत आहेत. मला पुन्हा सत्ता द्या, मग मतदारांचा अनादर करण्याची कोणाचीही हिम...